पाकिस्तान-१

दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता. खिलाफवेळीही मुस्लीम जगाची चर्चा झाली तरी पाकिस्तान हा शब्द आला नाही. लंडनमध्ये बसलेल्या चौधरी रहमत अली या तरुणाच्या मनात 1933 मध्ये पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा आला. हा शब्द एक पवित्र स्थान सूचित करतो का? पण मग उर्दू आणि संस्कृत शब्दांची ही सरमिसळ कशी झाली?
रहमत अलीनेही ‘पवित्र स्थळा’चा विचार केला नव्हता. त्याच्या मते ते एक संक्षिप्त रूप होते. पंजाबमधून पी, अफगाणमधून ए (खैबर-पख्तून), काश्मीरमधून के, सिंधमधून एस आणि बलुचिस्तानमधून स्टॅन. नंतर लोकांना वाटले की बोलण्यासाठी मध्यभागी ‘i’ टाकणे आवश्यक आहे, म्हणून पाकिस्तान शब्दाची निर्मिती झाली. पण बंगालचे काय? त्यांच्यासाठी कोणताही शब्द नव्हता. रहमत अली म्हणाले होते की बंगिस्तान (बंगाल) आणि उस्मानिस्तान (हैदराबाद) आणखी दोन मुस्लिम देश होतील.
मुस्लिम लीगने हे स्वीकारलं पण रहमत अलीला विशेष महत्त्व दिले नाही. नंतर फाळणीनंतर तो लवाजमा घेऊन नव्या पाकिस्तानात आला, तेव्हा त्याचं model स्वीकारलं गेलं नाही याचा त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने कायदा-ए-आझम यांना ‘क्विसलिंग-ए-आझम’ म्हटले. (क्विसलिंग हा नॉर्वेजियन देशद्रोही होता जो नाझींमध्ये सामील झाला होता. हा शब्द नंतर लियाकत अली खान यांनी शेख अब्दुल्लासाठी वापरला होता.)
जाहीर आहे, रहमत अलीचं संपुर्ण बाडा बिस्तर हिसकावून घेण्यात आले आणि त्याला हद्दपार करण्यात आले. काही वर्षांनी लंडनमध्ये त्याचे निधन झाले. पाकिस्तान हा शब्द देणाऱ्याचे हे हाल झाले. आजारी असूनही कायदे आझम यांनी शक्य तितकी प्रशासनाची जबाबदारी पेलली. पण 1948 मध्येच त्यांचा मृत्यू झाला.लियाकत अली खान हे आता पाकिस्तानचे सर्वोच्च नेते होते. फाळणीनंतर पंजाबचे दोन तुकडे झालेल्या पाकिस्तानात पख्तून आणि बलुच लोकांना आपले स्वातंत्र्य हवे होते. बंगालींचा त्यांच्यावर लादलेल्या उर्दूशी काहीही संबंध नव्हता. आणि काश्मीर? नेहरूंवर जसा काश्मीर भारतात गमावल्याचा आरोप केला गेला, तसाच आरोप पाकिस्तानमध्ये लियाकत अली खान यांच्यावर नेहमीच केला जाईल.
त्यादिवशी कंपनीबागेत त्यांच्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानाचा अंतं अशा प्रकारे खुलेआम झाला. देशाच्या संस्थापकाला देशवासियांना का मारावेसे वाटेल? होय! काश्मीर गमावल्याबद्दल लोकांमध्ये नक्कीच नाराजी होती. अगदी काही महिन्यांपूर्वी त्याच रावळपिंडीत एक कट रचला गेला, जिथे सत्तापालटाची योजना आखण्यात आली होती. मेजर जनरल अकबर खान, त्यांचे इतर काही लष्करी सहकारी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानचे सरचिटणीस सय्यद सज्जाद झहीर आणि प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्यासह सर्व कटकारस्थान करनार्यांना अटक करण्यात आली.
क्रमशः
मूळ लेखक – प्रविण झा.
पुस्तक – दास्तान- ए- पाकिस्तान.

Dastan E Pakistan


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *